Skip to main content

लहानपणीच्या गोष्टी- भाग १


प्रत्येकाच्या लहानपणी अशा काही गमती होतात कि त्या तुमच्या घरात नेहमी रंगवून सांगितल्या जातात. आपल्या अतरंगी व्यक्तिमत्त्वाची कहाणी असते ती, नाही का ?
माझ्या शांत (?) स्वभावाची स्तुती करणाऱ्याला माझ्या या माझ्या अतरंगी पणाचे  किस्से ऐकवून  घरातले मला चांगलंच लाजायला लावतात.  तर असाच एक किस्सा आहे मी आमच्या पाळीव भू भू ला त्रास दिल्याची, त्याचं नाव टायगर होतं.
पप्पांचे गावातले मित्र घरी यायचे तेव्हा ते सांगायचे कि आम्ही कुत्र्याला घेऊन जरंड्यावर  (जरंडेश्वर - डोंगर) शिकारी ला गेलो होतो (हे लोक ससे मारून खायचे). तोपर्यंत मी गोष्टींमध्ये ऐकलं होतं आणि टीव्ही ला पाहिलं होतं कि राजे लोक घोड्यावर बसून शिकारीला जायचे आणि धनुष्य बाणाने प्राण्यांची शिकार करायचे. (मी ३-४  वर्षांची असेंन तेव्हा). मग माझ्या डोक्यात विचार आला कि हे लोक (गप्पा मारणारे) कुत्र्यावर बसून कशीकाय बरं शिकारीला जात असतील!? फार दिवस मी याचा विचार करत असणार कारण काही दिवसांत मी हे खरंच आजमावून पाहिलं. 
एक दिवस मम्मी दारात उंबरठ्यावर बसून काहीतरी शिवत होती. पुढे अंगणात कडुलिंबाच्या झाडाखाली गारव्याला आमचा टायगर निवांत पहुडला होता. तेवढयात मी घरातून खेळायला बाहेर आले, मला टायगर झाडाखाली झोपलेला दिसला. माझ्या डोक्यात शिकारीचा विचार आला. मी मनाशी ठरवलं, हीच ती वेळ! आता आपण पण बघुयात लोक कुत्र्याला शिकारी साठी कसं वापरतात ते! मी घरातून बाहेर तडक टायगर कडे गेले आणि कुणालाच काही कळायच्या आत त्याच्या पाठीवर जाऊन बसले. 
सगळेच जण बेसावध होते- मी, मम्मी आणि बिचारा टायगर!
तो बिचारा घाबरला, बावचळला आणि उठून एकशेवीस च्या स्पीड ने धावत सुटला. तो जसा जागेवरून उठला तशी मी धाडकन खाली पडले - मला तर कळलंच नाही नक्की काय झाला ते! आसपास काय चाललंय ते मला कळलं तेव्हा सगळे जण पोट धरून हसत होते. 
मग असं डोकं आपटून घेतल्यावर मला कळलं कि लोक कुत्र्यावर बसून शिकारीला जात नाहीत ते! 



लेख आवडल्यास क्रेडिट सोबत शेयर करा 
मराठी मुलगी | vedantisalvi.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

हापूस आणि मी!

हापूस आणि मी! एक जमाना होता, जेव्हा उन्हाळ्यात नखं पिवळी दिसायची (कावीळ नाही ओ) आंब्यांमुळे.  आत्तासुद्धा काही सुखी, श्रीमंत (सुखी असणे आणि श्रीमंत असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत बरं का!) घरांतील सदस्यांची नखे झाली असतीलच पिवळी. लाॅकडाऊन मध्ये सुद्धा त्यांनी ४-४ डझनाच्या हापूस आंब्याच्या पेट्या आणल्या असतील बरेचवेळा. आमच्या सारख्यांना आत्ता मे महिना संपल्यावर अर्धा डझन(च) आंबे विकत घेता आले. (पायपीट करणाऱ्यांना आणि मजूरांना यंदा तेही नशीबात नसेल अजून). असो. आम्ही पाऊस पडायला लागल्यावर बाजारात येणारे लोकल आंबे खाणार आहोत- आम्ही आत्मनिर्भर! (कोल्ह्याला द्राक्षे आंबट!) माझ्या लहानपणी, आम्ही गावाकडे रहायचो तेव्हा, पप्पांनी शेकड्याने देवगड हापूस विकत आणले होते - straight from Konkan!  तेव्हा असे १०० आंबे लोक विकत घेऊ शकत होते. (आता सामान्य माणूस सहज १०० आंबे विकत घेऊ शकला तर सामान्य माणसाचा 'विकास' झाला असं म्हणायचं! काय बरोबर ना? आता कुणीही offend होऊ नका, लगेच मिरची लागते राव तुम्हाला!) तर ते आणलेले आंबे घरात पिकत घातले होते. घरभर हापूस आंब्यांचा मस्त सुवास दरवळायचा. असं अस...

आमची केमिस्ट्री लॅब

१० वी नंतर मी सायन्स साइडला ऍडमिशन घेतलं- सातारकरांच्या लाडक्या YC कॉलेज ला. कॉलेज चालू झालं. माझ्या क्लास डिव्हिजन चा काहीतरी घोळ झाला होता त्यामुळे मी पहिल्या पहिल्यांदा दिसेल त्या अकरावीच्या वर्गात जाऊन बसायचे. तेव्हा अटेन्डन्स घेतली जात नव्हती मग काय सरळ I डिव्हिजनमध्ये जाऊन बसायला लागले. त्या आधी थोडे दिवस बी डिव्हिजन मध्ये बसून पहिल. मला तिथलं शिकवणं फार आवडलं नाही म्हणून I डिव्हिजन! थोड्या दिवसांनी ग्रुपवाईज डिव्हिजन मिळाली- E डिव्हिजन. (पूर्ण  E डिव्हिजनच्या गमती नंतरच्या पोस्ट मध्ये सांगेन). हा तर मग या नंतर  अटेन्डन्स  घ्यायला चालू केली आणि रेग्युलर प्रॅक्टिकल्स पण चालू झाले. आमच्या डिव्हिजन च पहिलं केमिस्ट्री प्रॅक्टिकल मला चांगलं आठवतंय. आम्हाला दिलेल्या कंपाऊंड चा मेल्टिंग पॉईंट काढायचा होता। सरानी सगळं एक्सप्लेन केलं आणि म्हणले करा प्रॅक्टिकल चालू. आमच्या ग्रुपने नुसती capillary भरून ठेवली होती, ना बर्नर चालू केलं होता, ना स्टॅन्ड आणलं होता,  ना Theils tube आणली होती. सगळाच आनंदी आनंद! शेवटी शोधाशोध करून...